काव्यविश्व

आघात

हे ओवळा, रम्य उखी पिवळ्या उनेत
होतास मंदाक्ष्ररे,अनिले गुंजीत।
आहा। हं । मार्दत्व नयनांस वेधे
चारू सुगंध, दिग्भरित मना सुखादे॥

स्मृतीच्या माळरानावर

तुझ्या स्मृतीच्या माळरानावर

माझी स्मृती फ़ुलु देत
एकदातरी प्राजक्तासारखी।

अमिट लेख

तुझ्या कुंकवाला
आधार गं मेणाचा
पणतीत नाही ज्योत
प्रकाश काजव्यांचा

प्रारब्ध

एक मातीची पणती
प्रज्वलित पर्णकुटीत
शक्तिभर-
पण आता

एक पूर्णविराम....?

एक टिंबवलय...
अर्भकाचे निसटते क्षण
बेंबीच्या देठाशी असलेले नाते
फ़ुलारलेले नवजात....

कुठे काही

कां आताही शेष आहे शोध
किना-यास लागे मन
कां बघतो इतुक्या कौतुकाने मंथन झालेल्या
सागराला.

--- अशोक लंगडे

कैद

निसर्गात फ़ळा- फ़ुलांची मजा चाखताना
विहरता स्वच्छंद, आकाशी मजेत
स्वच्छ, हिरवे,पोपटी,लोकरी पंख त्याचे
चोचेत चोच व हाक देण्याची आतुरता

जखम

काजव्यांचे रोप पेरुन
घेवु पहातो पीक चांद्ण्यांचे
पण फ़ुलली असते निराशाच
निष्क्रीय गाजर गवतासारखी

पथिक

मी आणि तू,तू आणि मी
पथिक आहोत एकाच वाटेचे
पण-
तुला आवडते फ़ुलांची सेज

भ्रमंती

जीवन प्रवासात
दोन पक्षी
उडत जातात बेसहारा

पामर

विस्म्रुत कशी होईल?
ती धनतेरसची रात्र आणि-
आलिशान इमारतींवर
जगमगणारे दिप !

गावचा वड

माह्या गावचा गा वड
होता जव्हा भर जवानीत
वड सायीत्रीच्या दिशी
त्याले बाया गा पुजत

पाऊस काई पडत नाय,त्तेनं काई अडत नाय.

काय ल्याहाव पावसाचं,
मले काई कयत नाय.
बोल्याचं त खुप काई,
पण मले काई जुयत नाय...

नगरवधू...

पुन्हा पुन्हा आठवतात
तुझे अतृप्त डोळे
आणि--
तुझेच घायाळ स्वप्नपक्षी

बळीराजा

भिंतीच्या उलगडल्या रेघा
लई दिस झाले, नाही मारला चुना
पावसाचं आड्यातुन गळते पाणी
लई दिस झाले, नाही फ़ेरलं आडं

सांगून ठेवतो

आकाशात चमकणा-या रम्य चंद्रा
आज ढ्गाआड लपू नकोस
सुगंध शिंपणा-या फ़ुलावरच
ओलं दंव टिपू नकोस

आषाढास -

विखुरल्या स्वप्नातील कळ्या,
सांत्वन तरीही देत राहिलो
बुडले रे सर्व किनारे,
नाव तरीही वल्हवित राहिलो.

अटळ सत्य......

किती घेशील आढेवेढे,
तुझ्या पैंजणातूनच
झळकणार तुझी प्रिती.
घुंघरू अबोल का कधी?